प्रहार दिव्यांग संघटनेचे उपोषण अखेर तिसऱ्या दिवशी स्थगित!
तहसीलदार डॉ.अभिजित जाधव यांची यशस्वी शिष्टाई!
फलटण : प्रहार दिव्यांग संघटनेचे तीन दिवसापासून चाललेले उपोषण आज अखेर स्थगित करण्यात आले. आंदोलनकर्ते व तहसीलदार यांच्या शिष्टमंडळामध्ये सकारात्मक चर्चा झाली. व तहसीलदारांनी लेखी पत्र दिले.
पत्रामध्ये खालील प्रमाणे म्हटले आहे की,उपरोक्त विषयास अनुसरुन कळविणेत येते की, आमरण उपोषण करणेबाबत. दि. 13/5/2026 रोजी समक्ष चर्चा करुन पुढील प्रमाणे कार्यवाही करणेत आलेली आहे.
1. फलटण तहसील कार्यालय येथील संजय गांधी शाखेमध्ये श्रीमती श्रुती खानंदे ग्राम महसूल अधिकारी यांची पूर्ण वेळ नियुक्ती करण्यात आलेली आहे.
2. दिव्यांग बांधवांच्या जागे संदर्भात माननीय निवासी उपजिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करणेची विनंती त्यांना करण्यात येईल.
3. दिव्यांग बांधवा प्रति सहानुभूतीची भूमिका न ठेवणाऱ्या मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक यांना लेखी समज देण्यात येईल.
4. मे 2025 मधील अवकाळी पावसाची बाधितांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याची दक्षता घेण्यात येत आहे.
5. मौजे सोमंथळी येथील पानंद रस्त्याबाबत स्थळपाहणी करून घेऊन एक महिन्यात पुढील कारवाई करण्यात येईल.
6. त्याशिवाय संघटने मार्फत वेळोवेळी उपस्थित करण्यात येणाऱ्या पुरवठा आणि संजय गांधी शाखेतील प्रश्नांबाबत वेळेत कार्यवाही केली जाईल.
असे लेखी पत्र तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी आंदोलनकर्ते यांना दिले. त्यानंतर तहसीलदारांच्या हस्ते लिंबू सरबत देऊन उपोषण सोडवण्यात आले.









