RKC इन्फ्रा कंपनीकडून शासनाच्या पैशाचा अपव्यय?
पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांच्या सोयीनुसार बसथांबे बांधले नाहीत.
NHAI कडून RKC इन्फ्रा कंपनीला अभय?
हायवेच्या नावाने चांगभले भाग -2
फलटण: पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग हा संत ज्ञानेश्वर पालखी महामार्ग म्हणून ओळखला जातो.
या महामार्गाचे काम करणाऱ्या आर के सी इन्फ्रा कंपनीकडून अनेक चुकीच्या पद्धतीने कामे झालेले असून आपण ती शासनापुढे आणून देत आहोत जेणेकरून याबाबतीत सुधारणा होतील.
आर के सी कंपनीने महामार्गावर विविध ठिकाणी उभे केलेले बस थांबे हे गावामध्ये नसून गावाच्या बाहेर उभे केले आहेत. ज्या ठिकाणी प्रवासी बससाठी उभे राहतात अशी मध्यवर्ती ठिकाणे सोडून हे बस थांबे उभे केले आहेत. यामुळे शासनाचा पैसा वाया गेलेला दिसून येत आहे. आर के सी कंपनीने शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. त्यांना NHAI कडून अभय दिले जात आहे का? हा खरा प्रश्न उभा राहतो. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रत्यक्ष वस्तुस्थितीदर्शक पाहणी करणार का? की नुसता देखावा करणार हेही सर्वसामान्य लोकांना समजणार आहे.









