तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून टाकळवाडे ग्रामपंचायत निवडणूक ताकतीने लढवणार- भाऊसो मिंड
मिंड एकीकरण समीकरणाने दोन्ही पारंपारिक गटापुढे तगडे आव्हान?
फलटण: आगामी होऊ घातलेल्या टाकळवाडे पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सर्व समावेशक, समविचारी लोकांना एकत्र करून तिसरी आघाडी तयार करून निवडणूक लढवणार असल्याचे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना युवा नेते भाऊसो उत्तम मिंड यांनी सांगितले..
अल्पावधीतच भाऊसो मिंड यांनी गावातील मिंड परिवारातील तरुण पिढीला बरोबर घेऊन त्यांचा स्वाभिमान जागा करून एक वेगळी ताकत निर्माण केलेली आहे. या मिंड एकीकरणाच्या समीकरणामुळे दोन पारंपरिक गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसून येत आहे. दोन्ही गटाने साम दाम दंड भेद वापर करायला सुरुवात केली असून हे कोंड सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेले तीस वर्षापासून मिंड परिवारातून कोणी स्वयंभू नेतृत्व पुढे आले नसून आज मात्र भाऊसो मिंड यांच्या नेतृत्वाने ते पुढे येत आहे.
तिसरी आघाडी पुढे आल्यामुळे दोन्ही पारंपारिक गट ,सत्ताधारी राजे गट व व पिंटू इवरे गट यांच्यापुढे तगडे आव्हान उभे राहिले आहे. सत्ताधारी राजे गटाने गावात केलेली विविध विकास कामे पुढे घेऊन निवडणुकीला सामोरे जाईल,तर विरोधी पिंटू इवरे गट सत्ता नसताना ही गावात लाखो रुपयांची केलेली कामे व वैयक्तिक लोकउपयोगी कामे करून आपला वाढवलेला जनाधार घेऊन निवडणुकीला पुढे सामोरा जाईल.
क्रमशः…..









