मिंड पॅटर्न म्हणजे फुसका बार! एका आडनावावर व जाती- धर्मावर दीर्घकालीन राजकारण करता येत नाही!
फक्त मिंड परिवाराचे राजकारण न करता गावातील सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणार -भारत भाऊसो मिंड -पाटील
फलटण: आगामी टाकळवाडे गावातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसतसे एक एक पत्ते बाहेर येत आहेत.
मिंड पॅटर्न म्हणुन राजकारण करता येणार नसून एका आडनावावर किंवा धर्म जातीवर दीर्घकालीन राजकारण करता येत नाही! जो सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन राजकारण करतो तोच गाव गाड्यात दीर्घकालीन राजकारणात टिकून राहतो. आगामी निवडणुकीना सामोरे जाताना गावातील सर्व जाती-धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जाणार असुन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावणार आहे असे भारत भाऊसो मिंड पाटील यांनी आपले मत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केले.
तसेच ते म्हणाले की, मिंड परिवार पॅटर्न हा परिवारातील लोकांचे सुख दुःख वाटून एकत्रित करण्यासाठी आहे.परंतु या आडून कोणी फलटण मध्ये बसून राजकारण करू नये.तसेच मिंड परिवारातील तरुणांची डोकी भडकवण्याचा प्रयत्न कोणी करू नये. गावगाड्यात प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाची गरज असते.टाकळवाडे गावाचा सामाजीक सलोखा हा वेगळा आहे.यामध्ये कोणतेही विघ्न येऊ देणार नाही.आज पर्यंत मिंड परिवाराने अनेक पदे भुषवली आहेत. यात सर्व समाजाचे योगदान आहे व त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. तरुणांच्या शपथ घेऊन त्यांचे भावनिक राजकारण केले जात असून यामुळे नाती-गोती तुटण्याच्या मार्गावर आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी अशा प्रकारे सामाजिक द्वेष पसरवून मिंड परिवाराच्या आडून कोण राजकारण करणार असेल तर अशा अपप्रवृत्तींना आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकारणाच्या शाळेतील योग्य तो धडा शिकवला जाईल असे ही भारत भाऊसो मिंड पाटील यांनी म्हटले आहे.









