भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील
तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत
फलटण: टाकळवाडे गावचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते भाऊसो उत्तम मिंड पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आपली मते व्यक्त केली.
यावेळी ते म्हणाले की, सध्या टाकळवाडे गावामध्ये आमच्यासारखे शहाणे कोणीच नाही, गावामध्ये ठराविक आडनावाशिवाय गावाला पर्याय नाही अशी काही लोकांची जी मानसिकता आहे ती मोडून काढायची आहे.
गावातील युवकांना माझे आवाहन आहे की, भावा- भावात , जाती जातीत भांडणे लावून काही लोकांना आपली राजकीय पोळी भाजायची आहे. गनीमांनी फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधण्याचा प्रयत्न करू नये.तरी युवकांनी शांत रहावे अफवांना बळी पडू नये.
पाठीमागील झालेल्या पंचायत समिती , जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये गावातील दोन्ही पारंपरिक गट हे एकत्र असताना 670 मतदान पडले होते. व आपल्या गटाला 400 मतदान झाले होते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षातील घटकांना एकत्र करून सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहे. यामुळे आगामी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये आपली सत्ता येणार हे निश्चित आहे.








