महाराष्ट्र शासनाने महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस. कर्मचारी यांची ड्युटी आठ तासाची करावी – पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख गजानन भगत यांची मागणी 


महाराष्ट्र शासनाने महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस. कर्मचारी यांची ड्युटी आठ तासाची करावी –

पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख श्री. गजानन भगत यांची मागणी

 

पुणे प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाने महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस. कर्मचारी यांची ड्युटी आठ तासाची करावी तसेच महिला पोलीस कर्मचारी त्यांची ड्युटी ही दिवसांमध्ये असावी अशा मागण्यांचे निवेदन पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेच्या वतीने

पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय जनसंपर्कप्रमुख श्री. गजानन भगत यांच्यावतीने मुख्यमंत्री तथा गृहराज्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

 

 

पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थाच्या विचार करण्याची गरज आहे. पोलिसांनाही योग्य विश्रांतीची गरज आहे. चोवीस चोवीस तास सतत ड्युटी केल्यामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडले जात आहे. तरी शासनाने पोलिसांची ड्युटी आठ तासाची करण्याचा निर्णय घेण्याची मागणी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांनी पत्रकाद्वारे केली आहे. महाराष्ट्र पोलीस खात्यातील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी व पोलीस दलातील महिला अधिकारी व कर्मचारी वर्ग अतिशय कर्तव्यदक्ष प्रामाणिक पणे जिवाची पर्वा नकर्ता कर्तव्य बजावत असतात. आपल्या कुटुंबासोबत कुठल्याही परिस्थितीत कोणताही सण आणि इतर सुखाचा वेळ देऊ शकत नाहीत. पोलिसांना २४ तास सतत जनसेवेसाठी सज्ज रहावे लागते. पोलीस दलातील अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत कर्तव्यनिष्ठ असतात आम्ही. सामाजिक कार्यकर्ते असल्याने अनेक वेळा पोलिस बांधवांशी आमचा संपर्क आला आहे, आमच्या मनामध्ये पोलिस बांधवांनबाबत आदर आहे. पोलिसांनी जनतेला रात्रंदिवस तत्पर सेवा मिळावी म्हणून अनेक पथकेही स्थापन केली आहेत. उदा महिलांसाठी दामिनी पथक जेष्ठ नागरीकांसाठी, लहान मुलांसाठी, वाहतुकीसाठी सतर्क अशा विविध अनेक जनतेच्या सेवेसाठी सुविधा उपलब्ध केले आहेत. पोलीस बांधव चोवीस तास इतके प्रामाणिक पणे काम करीत असताना सुद्धा समाजातील काही लोक पोलिसांकडे अतिशय संशयी नजरेने पाहत असतात. समाजातील अशा लोकांनी पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. अति ताणामुळे पोलिसांचे मानसिक आरोग्य बिघडत असते. अशा परिस्थितीत त्याना कुटुंबियांना जास्त वेळ देता येत नाही त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासाची असावी म्हणजे ते आपल्या कुटुंबाला पुरेसा वेळ देतील .. आज पोलिसांमुळे जनता सुरक्षित आणि सुखरूप आहे पण पोलिसच असुरक्षित आहे. त्यामुळे पोलिसांची ड्युटी आठ तासाची असावी अशी मागणी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांनी या पत्रकाद्वारे केली आहे.

प्रत. खालील प्रमाणे मान्यवरांना पाठवलेल्या आहेत.

१) मा. आचार्य देवव्रत (महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल)२) मा. देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य)३) मा. एकनाथजी शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)४) मा. अजित दादा पवार (उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य)५) मा. सदानंद दाते (पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य)


संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

22
कृपया वोट करा

AP NEWS MAHARASHTRAच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांचे झाडे न तोडण्याचे फलटण नगर पालिकेला स्पष्ट निर्देश !  पालखी सोहळा प्रमुख अथवा कोणीही विश्वस्त झाडे तोडा असे कधीही सांगणार नाही! योगी निरंजननाथ, विश्वस्त , आळंदी देवस्थान  मला तोडू नका:भाग -3 

फलटणच्या गजानन चौकातील वृक्षतोडी संदर्भात नगर पालिकेचा आळंदी देवस्थानला खो! संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या शिकवणीनुसार वागणार की झाडे तोडण्याचा “आदेश”?मला तोडू नका: भाग 2

भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या माध्यमातून आगामी टाकळवाडे ग्रामपंचायतची निवडणूक सर्व जाती धर्मातील समविचारी लोकांना एकत्र घेऊन लढवणार – भाऊसो मिंड पाटील तिसऱ्या आघाडीने गावच्या राजकारणात रंगत!

error: Content is protected !!